महादेवी हत्तीणीसाठी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वस्त्रनगरी वृत्तसेवा

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलेल्या नांदणी (ता. शिराेळ) येथील नांदणी मठातील महादेवी उर्फ माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने रिट पिटीशन दाखल करण्यात येईल, अशी घाेषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबईतील बैठकीत केली. त्याचबराेबर या प्रकरणात पाेलिसांनी ज्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत, ते सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे या आमदार राहुल आवाडे यांच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी निश्चितपणे सर्व गुन्हे मागे घेतले जातील, अशी ग्वाहीही दिली. शासनाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे महादेवी हत्तीण परत नांदणी मठात येण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

मागील 35 वर्षे नांदणी येथील मठात असणाऱ्या महादेवी हत्तीणीला पेटा या संस्थेने महादेवी हत्तीणीची देखभाल नीटपणे हाेत नसल्याबद्दल तयार केलेल्या अहवालाच्या माध्यमातून जामनगर (गुजरात) येथील वनतारा याठिकाणी पाठविण्यात आले आहे. या निर्णयाच्या विराेधात सर्वच स्तरातून तीव्र भावना व्यक्त हाेत असून महादेवी उर्फ माधुरी हत्तीणला परत आणण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात वेगवेगळ्या मार्गाने आंदाेलने छेडली जात आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार राहुल आवाडे यांनी घेतलेल्या पुढाकारातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी बैठक आयाेजित केली हाेती

यावेळी आमदार राहुल आवाडे यांनी, नांदणी येथील जिनसेन भट्टारक पट्टाचार्य मठातील माधुरी उर्फ महादेवी हत्तीण ही काेल्हापूर जिल्ह्याच्या अस्मितेचे प्रतीक आहे. सर्वधर्मीयांच्या भावना तिच्याशी जाेडलेल्या आहेत. त्यामुळे शासनाने यामध्ये हस्तक्षेप करून महादेवी हत्तीणीला परत नांदणी मठाकडे सुपूर्त करावे. सर्व जातीधर्माच्या लाेकांच्या लाेकभावनेचा जराही विचार न करता वनतारा येथे स्थलांतरीत करण्यात आले. स्थानिक जनभावना व धार्मिक श्रद्धा लक्षात घेऊन, पुन्हा तिला परत आणण्याची शक्यता अजूनही अस्तित्वात असलेने शासनाने यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी केली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनीही आपल्या मनाेगतात महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी राज्य शासनाने यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी केली. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हत्तीणीला न्यायालयाच्या निर्णयानुसार वनतारामध्ये नेण्यात आले. त्यामध्ये शासनाची भूमिका नाही. हा न्यायप्रविष्ठ विषय आहे. परंतु हत्तीणीमध्ये गुंतलेल्या जनभावनांचा लक्षात घेऊन जे काही कायदेशीर पर्याय आहेत त्यानुसार राज्य शासन महादेवी उफर् माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी प्रयत्न करेल. नांदणी मठाने सर्वाेच्च न्यायलयात याचीका दाखल करावी.

तसेच सरकार म्हणून देखील आम्हीही सर्वाेच्च न्यायलयात याचीका दाखल करणार आहे. महादेवी परत यावी अशी आमची भूमिका आहे. तिची काळजी घेण्यासाठी डाॅक्टरांच पथक तयार करण्यात येईल राज्य सरकार नांदणी मठासाेबत पूर्ण ताकदीनिशी साेबत राहिल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *